Tuesday, 10 May 2011

विद्यालयीन जीवनासाठी मराठी ऐवजी इंग्रजी पूर्णपणे अनैसर्गिक.


                            शाळेतील दिवस आठवतात का ?
        
   मला आठवतात ते दिवस ,  एक प्लास्टिक ची बाग त्याच्या मध्ये एक पाटी, एक पेन्सील , एक उजळणी , आणि एक फाटक्या कपड्यापासून तयार केलेले एक पाटी पुसण्यासाठी duster  , फक्त इतकेच साधन घेऊन जायचो . १०.२० ला शाळा भरायची ,
१ ली ते ४ थी पर्यंत तर खूप मजा यायची कारण गुरुजी खूप मारायचे आणि ज्याचे चुकले त्याला नाक धरून मारायला  सांगायचे . जर नाक धरून  मारायचे चुकले कि छडी आणण्यास पाठवायचे . .मग थोड्या वेळात इंटरवेल होयचा मग हीच प्रक्रिया रोज होयाची . पण आता काहीच समजत नाही पहिले जी शाळा व्हायची आणि ती मजा यायची आजच्या मुलांना येत नाही कारण ....आता हस्तकला चे क्लास होत नाहीत , कब्बडी होत नाही , खो खो नाही , फक्त एकाच वेंड शिक्षकाच्या आणि मुलांच्या डोक्यात क्रिकेट | 
          मला सांगा क्रिकेट किती जन खेळू शकतात १० ते १२ जन आणि एका वर्गात किती मुल असतात ४० ते ५० किंवा ५० ते ६० जर बारा खेळाडू बाजूला निघाले आणि उरलेले शिल्लक मुल काय करायचे ? 
           आणखी दुसरी गोष्ट आता पाहिलेच्या सारखी कविता येत नाहीत नुसते इंग्रजी चा विचार त्या लोकांच्या डोक्यात घालत आहेत . पण लक्षात असू द्या कि अगोदर मराठी च्या माघे लागा नंतर त्या इंग्रजीच्या . आपल्या जर एखाद्या लहान मुलाला विचारले कि एखादी मराठी चे पुस्तक वाचून दाखव तर म्हणतो मला येत नाही . याचा विचार करायला  हवाय .
                                                                                                                                 कुटमुलगे मल्हारी 
                                                                                                                                  ० ९०३२० ९५१३६ 

3 comments:

  1. विचार पटले...
    लिहित राहा...शुभेच्छा...

    ReplyDelete
  2. धन्यवाद तुम्ही माझे विचार वाचालत मला आनंद झाला !

    ReplyDelete
  3. खूप सुन्दर लिहिले आहे. . .

    ReplyDelete