Wednesday, 6 July 2011

आपला मुलगा इंग्रजी शिकला पाहिजे असे कोणी लिहून ठेवला आहे का ?

काय हे कसला प्रकार चालू आहे आमच्या महाराष्टात जो तो नुसते इंगजी - इंग्रजी - इंग्रजी च्या माघे लागला आहे , अरे पण आता पुरे करा किती  गैर वापर करणार आपल्या मराठी भाषेचा  , म्हणजेच मराठी संस्कृतीचा ! पण हे थांबवायला हवाय , भरपूर त्रास सहन झाला आतापर्यंत महाराष्ट्रात मोजक्याच शाळा उरलेल्या आहेत , १००% मधून ३५% मुल मराठी शिक्षणाचा वापर करत आहेत . पण का रे बाबा जर मराठी मुलगा मराठी माध्यमात शिकला तर तो थोडेच चंद्रावर जाऊन बसणार आहे मग नाही जगातील श्रीमंत म्हणून व्यील्याम ब्रीग्रेद होणार आहे . मग नाही तर अमेरिका राष्ट्रपती ओबामा होणार आहे , जरा विचार करा माझ्या आदर्शवान  मराठी आई आणि वडिलानो तुम्ही उलट आम्हाला प्रोस्ताहन दिले पाहिजे कि मराठी शाळा चालवा , आमचा मुलगा बरोबर शिकत नाही , अरे आम्ही पाहतो कि आमच्याकडील शहराकडे राहणाऱ्या मुलाला बे एक बे म्हणजे कळत नाही !!!!
तुम्ही त्या हलकट आणि निर्लज्ज  सरकारच्या माघे लागायला पाहिजे कि आमची मराठी शाळा बरोबर चालवा .
हे पहा आपल्या मुलाला इंग्रजी शिक्षण द्या ! असे कुणी लिहून ठेवलं आहे का ?
नाही ना ?
बघा आपल्याकडे बरेच मराठीतून साहित्यकार , कलाकार , नेता गिरी , संत महात्मे होऊन गेली ते का इंग्रजी शिकलेले होते ? नाही ना , मग तुम्ही का इतकी धडपड करता कि माझा मुलगा इंग्रजी शिकला पाहिजे म्हणून ?
बघा हे सर्व इंग्रजी स्वंस्था चालक त्या गद्दार सरकार सोबत आहेत , आपण त्यांचा निषेध केला पाहिजे !

आपली मराठी संस्कृती मराठी माणसालाच टिकून ठेवायला पाहिजे , मी तर लहान आहे हो तुम्ही बुद्धिवंत आहात कही चुकले तर क्षमा करा !
जय महाराष्ट्र 
                                                                                                              मल्हारी कुटमुलगे  
                                                                                                             ०९५३३ ४९ ५१३६

Tuesday, 28 June 2011

माझे भाषण - MY SPEECHES

अध्यक्ष महोदय !!!!!
पूज्य गुरुजन , तसेच माझ्या बालामित्रानो आणि बंधू भागीनोनो  व उपस्थित मान्यवर शिक्षक आणि जमलेल्या वडीलधऱ्यानो  आज तुम्हाला ...........यांच्या जयंती निमित्त ४ शब्द सांगणार आहे तरी ते चार शब्द शांत चित्ताने ऐकून घाव्ये हि नम्र विनंती ....................
 इतके जरी शब्द  पुढे stage वरती जाऊन म्हणायचे म्हंटले कि १०० वेळा जीवाचे रान झाल्यासारखे वाटत होते !
तुम्हाला पण चांगलाच अनुभव असेल कि शाळेतील भाषणांचा , अगोदर भीती वाटायची कि गांधी जयंती असो व इतर कोणतीही असो . भाषण म्हंटले कि अंगाला काठा यायचा , आणि घाबरत घाबरत stage  वरती जायचो आणि २ ते ३ मिनिटामध्ये ओबाढ - धोबाढ भाषण करून यायचो .
पण आता आणखी तेच दिवस आठवतात कि शाळेत जावे आणि छानसे भाषण आपल्या मित्रासमोर आपल्या शाळेतल्या शिक्षकासमोर मांडावे , पण गेली ते वेळ . काय करावे सुचतच नाही . फक्त ती आठवण सोबत आहे , त्या आठवनीला सोबत घेऊन फिरत असतो आणि  कोणतेही भाषण असले तिथे जाऊन थांबतो , पण जास्तीत जास्त शाळेतील मुलांचे असले तर काही पण काम असू द्या अगोदर भाषण ऐकतो .
MALLHARI
पण मिळालेली संधी येत  नाही हे मात्र खरे होते आजोबा खूप  सांगायचे मात्र आम्हाचा शेवट गेला कधीच त्यांची गोष्ट आम्ही ऐकलो नाही आणि शिक्षण जीवनात मात्र कमीच पडलो . आता फक्त ती आठवण आली कि शाळेकडे धावतो आणि तिथे जाऊन माथा टेकवतो , तेंव्हा थोड फार 
समाधान  होते .

Thursday, 26 May 2011

आणखी काही विसरलो काय ?



श्याम सूर्यवंशी
अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन बाकांवरती जाऊन बसतं ||

प्रार्थनेचा शब्द अन शब्द माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो ||

या सगळ्यात लाल खुणांनी गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि बाई , सर  तुमची शिल्लक सही ||

रोजच्या अगदी त्याच चुका आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत आयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंच बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं स्वतःलाच रागवून बघतो ||

इवल्याश्या या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा सवय आता गेली आहे ||

चांगलं अक्षर आल्याशिवाय माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द आता ठरवून सुद्धा येत नाही ||

दोन बोटं संस्कारांचा समास तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी रोज माणसं जोडतो आहे ||

योग्य तिथे रेघ मारून प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
मल्हारी
हळव्या क्षणांची काही पानं ठळक अक्षरात गिरवलेली ||

तारखेसह पूर्ण आहे वही |
फक्त एकदा पाहून जा |
लहू  येण्कुरे
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा |

Tuesday, 10 May 2011

विद्यालयीन जीवनासाठी मराठी ऐवजी इंग्रजी पूर्णपणे अनैसर्गिक.


                            शाळेतील दिवस आठवतात का ?
        
   मला आठवतात ते दिवस ,  एक प्लास्टिक ची बाग त्याच्या मध्ये एक पाटी, एक पेन्सील , एक उजळणी , आणि एक फाटक्या कपड्यापासून तयार केलेले एक पाटी पुसण्यासाठी duster  , फक्त इतकेच साधन घेऊन जायचो . १०.२० ला शाळा भरायची ,
१ ली ते ४ थी पर्यंत तर खूप मजा यायची कारण गुरुजी खूप मारायचे आणि ज्याचे चुकले त्याला नाक धरून मारायला  सांगायचे . जर नाक धरून  मारायचे चुकले कि छडी आणण्यास पाठवायचे . .मग थोड्या वेळात इंटरवेल होयचा मग हीच प्रक्रिया रोज होयाची . पण आता काहीच समजत नाही पहिले जी शाळा व्हायची आणि ती मजा यायची आजच्या मुलांना येत नाही कारण ....आता हस्तकला चे क्लास होत नाहीत , कब्बडी होत नाही , खो खो नाही , फक्त एकाच वेंड शिक्षकाच्या आणि मुलांच्या डोक्यात क्रिकेट | 
          मला सांगा क्रिकेट किती जन खेळू शकतात १० ते १२ जन आणि एका वर्गात किती मुल असतात ४० ते ५० किंवा ५० ते ६० जर बारा खेळाडू बाजूला निघाले आणि उरलेले शिल्लक मुल काय करायचे ? 
           आणखी दुसरी गोष्ट आता पाहिलेच्या सारखी कविता येत नाहीत नुसते इंग्रजी चा विचार त्या लोकांच्या डोक्यात घालत आहेत . पण लक्षात असू द्या कि अगोदर मराठी च्या माघे लागा नंतर त्या इंग्रजीच्या . आपल्या जर एखाद्या लहान मुलाला विचारले कि एखादी मराठी चे पुस्तक वाचून दाखव तर म्हणतो मला येत नाही . याचा विचार करायला  हवाय .
                                                                                                                                 कुटमुलगे मल्हारी 
                                                                                                                                  ० ९०३२० ९५१३६